सोलापूर : दि.२३ (एमडी24न्यूज) सोलापुरात गोरगरिबांना न्याय मिळणार आहे की नाही? पोलीस आमच ऐकून घेतच नाहीत. समोरच्या पार्टीकडूनच चुकीच्या फिर्यादी घेतात आणि आम्हाला छळतात असं सांगत आज दोन वेगवेगळ्या कुटुंबातील महिला,वृद्ध आणि तरुणांनी अक्षरशःटाहो फोडला. श्रमिक पत्रकार संघात दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा आज झाल्या. यात समोरच्या पार्टीकडून कशी गुंडगिरी होते आणि पोलिसांची त्यांना कशी साथ मिळते असं सांगताना महिलांना रडू कोसळलं. आम्हाला न्याय द्या,जीवन जगणं मुश्किल झाल आहे असेही त्या सांगत होत्या.
भवानी पेठ येथे राहणाऱ्या विश्वभूषण जगन्नाथ कांबळे - यांनी आपली व्यथा मांडली ते म्हणाले, ३ जून रोजी मला आणि माझ्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जोडभावी पोलिसांकडे तक्रार देण्यास गेलो असता तक्रार घेण्यास नकार दिला. नंतर वकिलांना घेऊन गेलो त्यावेळी १९ जणांविरुद्ध आपण तक्रार दिली आहे. आज पर्यंत यापैकी कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही. ज्या ज्या वेळी आम्हाला जबाब घेण्यासाठी बोलवतात त्यावेळी विरोधी पार्टीचे लोक उपस्थित असतात.
पोलिसांसमक्षही आम्हाला समोरच्यांनी खलास करतो अशा धमक्या दिल्या आहेत - हल्ल्याचं कारण माहित नाही. राजकारणी लोकांच्या पाठिंबामुळे माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर पोलीस अधिकारी चक्रधर ताकभाते कारवाई टाळतात. म्हणतात,कोर्टाने मला संबंधितांना अटक करण्याची परवानगी दिलेली नाही. पोलीस आयुक्तांपासून सर्वांना भेटलो ठीक आहे,पाहू एवढंच सांगण्यात आलं. गुन्हेगार रोज धमकावत आहेत. त्रास देत आहेत. माझी दोन मुलं समोरच्यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आत घातले. आम्हा महिला,मुलांसह सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलंय. मात्र समोरच्या पार्टीतील विशाल सोपान साबळे सुधीर बीडबाग,किरण गायकवाड, विजय कांबळे वगैरे १९ जणांवर कारवाई होत नाही असं का? असा सवाल करत महिलांना रडू कोसळलं. आम्ही जगावं की नाही आमच्यावर होत असलेल्या अन्यायाची कुठेच दखल घेतली जात नाही. इतकी या भागातील गावगुंडांची दहशत आहे. त्याला राजकीय पुढारीही पाठिंबा देतात हे दुर्दैव असं विश्वभूषण कांबळे आणि त्याचे नातेवाईक म्हणाले.
मित्तल नगर विजापूर रोड येथे राहणाऱ्या मुस्कान बापूताज पटेल - या आपल्या पती,सासु व लहान मुलांसह पत्रकार परिषदेसाठी आल्या. त्या म्हणाल्या,14 जूनला दुपारी दोनच्या सुमारास माझ्या घरी समदानी मत्तेखाने, अंजुम मत्तेखाने,वाजीदा आणि तोफिक पीरजादे त्यांच्या घरात घुसले दीर मुसद्दीक कुठे आहे ? त्यांना आमचे पैसे घेतले परत दिले नाहीत असे म्हणून बेदम मारहाण सुरू केली. आपण गरोदर आहोत त्रास देऊ नका. दिराचा आणि आमचा संबंध नाही ते गुलबर्गा येथे असतात असं सांगितलं पण कोणीही ऐकलं नाही. आम्हा सर्वांना बेदम मारहाण केली नंतर पोलीस आले असता किरकोळ वाद आहे असं त्यांनीच सांगितलं. पोलीस गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नवऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली आहे. मी आणि माझे पती फिर्याद देण्यास गेलो असता वैद्यकीय तपासणी करून या मग पाहू असं सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. हे सांगत असताना मुस्कान त्यांच्या सासू आणि पती पत्रकारांसमोर रडत होते आम्ही किती त्रास सहन करायचा. पोलीस काहीच दखल घेत नाहीत. उलट आता आम्हालाच अटक करण्याची धमकी देतात. कोणत्याही महिलेवर आपण हात टाकलेला नाही,असं बापूताज पटेल यांनी सांगितलं. ज्या महिलेने तक्रार दिली आहे ती आपल्या आईच्या वयाची आहे मी गैर कसं वागेल? भाऊ आणि आपल्याच सहा वर्षे झाले कोणताही संबंध नाही तरी हा त्रास होत आहे. कुणीच आपल्या तक्रारीची दखल घेत नसेल तर आत्महत्ये शिवाय पर्याय नाही असेही त्यांनी टाहो फोडून सांगितलं. हा गुन्हा विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे.