श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यास २०० कोटी तोटा आणि १ १००० कोटीचे देणे आहे. या बद्दल त्याने खुलासा करावा.
जर काडादी,स्वतःच्याच संचार मध्ये सर्वाधिक दर देणारा, पारदर्शक कारभार असणारा कारखाना,असे वारंवार खोटे छापून लोकांमध्ये (वास्तविक परिचारक आणि बबनदादा सर्वाधिक दर देतात) त्याने स्वतःचाच उदो उदो केल्यासारखे, स्वच्छ चारित्र्याचा असेल, (वास्तविक पहाता याच्यावर मटक्याची केस सोलापूर न्यायालयात आहे.) तर एवढा तोटा आणि देणेबाकी आहे. म्हणजे तो निर्बुद्ध आणि व्यवहार शून्य असला पाहीजे अथवा तो प्रचंड भ्रष्ट असला पाहीजे. या दोन शक्यता सोडल्या तर तिसरी शक्यता असूच शकत नाही. कारण आपल्या नंतर कारखाने चालू करून बबनदादा शिंदे नी ४ आणि दिलीपराव माने यांनी ३ कारखाने चालू केले. मग या दोन शक्यतेपैकी कोणतीही शक्यता असल्यास यांचे हाती आपला कारखाना असणे योग्य नाही.
आपला कारखाना दोन हंगाम चालू होणे अशक्य आहे असे हा म्हणत आहे. मी संजय भिमाशंकर थोबडे त्याला जाहीर आव्हान देतो की,मला १४० कोटी जून ३० तारखे पर्यंत देऊन कारखाना माझ्याकडे सोपविला तर मी या हंगामातच सह विज निर्मिती सह कारखाना चालू करून दाखवतो. तसेच चिमणी पडल्यामुळे ₹ १५०० कोटी नुकसान झाल्याचे हा सांगतो. प्रत्यक्षात र ५०० कोटीमध्ये आपल्या कॅपॅसीटीचा नवीन कारखाना मी उभा करून देतो. म्हणजे हा एकतर वेडा झाला आहे अथवा हा आपल्याला (सभासद शेतकरी आणि जनता) मुर्ख समजुन दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
याने मागील हंगामातच अर्कशाळेचे ( distillary ) विस्तारीकरण चालू करून ₹ २२ कोटी रूपये अडकवून ठेऊन मशीनरी मागविली आणी काम चालू केले परंतु प्राज ही बहुराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे आणि आपल्या कारखान्याला वातावरणीय परवानगी नसल्यामुळे त्यांनी काम अर्धवट सोडून पलायन केले आहे. सोलापूर महापालीकेने या विस्तारीकरणास परवानगी नाकारली आहे या सर्व ही बाबी किती संचालकांना माहीत आहेत.
आता या चिमणी पाडकामात भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचे हा सांगत आहे,हा पण एक दिशाभूल करण्याचाच प्रयत्न आहे. वास्तविक पहाता २०१८ साली उच्च न्यायालयाने याला उर्मट उद्घट आणि कायम बेकायदेशीर वागणारा असे संबोधून याला ३० मीटरपेक्षा जास्त उंच चिमणीला परवानगी मिळणे ही अशक्य असल्याचे नमूद केले असताना देखील हा त्यानंतर आतापर्यंत वकीलांवर सभासदांचे पैसे उडवित न्यायालयात खेटे मारत राहीला. एवढ्या पैशात नवीन चिमणी उभी राहून कारखाना सुरळीत चालला असता.
चिमणी ही केवळ बेकायदेशीर असल्यामुळेच पडली आहे आणि ती बेकायदेशीरपणे उभारण्याचे पाप हे एकमेव मटकाबहादूर काडादीचेच आहे. दुसया कोणत्याही संचालकांचादेखील यात काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे याने जिल्हाधिकारी यांना लिहून दिल्यानुसार १ ३५० कोटी व त्यावरील व्याज हे आणि केलेले सर्व नुकसान भरून द्यावे.
सरतेशेवटी मि अधर्मराज काडादी यांना आव्हान देतो की एका व्यासपीठावर येउन माझ्याबरोबर चर्चा करावी म्हणजे त्यांची अक्कलहुशारी सर्वांसमोर येईल.
यापैकी कोणतेही आव्हान जर त्यांनी स्वीकारले नाहीतर वर उल्लेखलेल्या शक्यतांपैकी ते कोण आहेत हे जाहीरपणे सांगून त्यांनी कारखान्याचे सर्व नुकसान भरून देउन सर्व सामाजिक संस्थांमधून राजीनामा द्यावा.
कामगारांचा प्रश्न उपस्थित करण्याचा काहीही संबंध नाही कारण २०२१ २०२२ अहवालानुसार कारखान्यात केवळ ४६५ कायम कामगार आहेत व कारखाना सुरळीत चालविण्याची आम्ही हमी देत आहोत आणि विमानसेवा चालू झाल्यावर यापेक्षा अनेक पटींनी सोलापुरात रोजगार वाढणार आहे.
तसेच प्रणितीताईंनी यात कोणतेही राजकारण नसताना यात उडी घेऊन याच्यामागे उभे राहून चिमणी कायदेशीर असण्याचा जो कांगावा उभा केला आहे,तो अत्यंत साहजिकच आहे,कारण कोणताही राजकारणी हा तवा गरम दिसल्यावर आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न हा करणारच, नाही केला तरच नवल. वास्तविक पाहता तुम्ही संविधानीक पदावर असताना,न्यायालयावर विश्वास दाखवून काडादीचे सांत्वन केले असते तर ते जास्त योग्य ठरले असते अथवा जर तुम्हाला बेकायदेशीर कामाचे समर्थनच करावयाचे असल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन तसे करावे जेणेकरून महामानवानी लिहिलेल्या भारतीय संविधानाचा अपमान होणार नाही आणि तुम्ही आरक्षित जागेवरील बांधकामाचा प्रश्न उपस्थित केला त्यावर तुम्ही स्वतः आमदार आहात तर योग्य त्या सनदशीर मार्गाचा अवलंब करून लढा द्यावा.
आणि आपण दिलेले चॅलेंज हा तर आपला बालिशपणा दर्शवितो,आपण तीनवेळा आमदार असूनदेखील आपण इथे उडान योजनेत आपला समावेश २०१६ साली प्रथम यादी मध्ये येउनदेखील विमानसेवा चालू करण्यास असमर्थ ठरलेल्या असताना आपण या बाबतीत न बोललेले बरे.
आणि याउलट आपण विमानसेवा (जीचा उपभोग आपणच सर्वात जास्त घेणार आहात) लवकरात लवकर चालू करण्याबाबत आग्रही असले पाहीजे पण आपण आपले सोलापूरवरील प्रेम हे बेगडी असल्याचे जनतेसमोर कबुल केले,कारण तुम्हाला तुमचा काडादीमालक आणि काडादीसाहेब हा सर्वसाधारण जनतेपेक्षा अधिक जवळचा वाटतो.