Ticker

6/recent/ticker-posts

...आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती होऊ देणार नाही शिंदे फडणवीस सरकारला तीस दिवसाचा अल्टिमेट

सोलापुर : दि.१८ (प्रतिनिधी) ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका जशा घेतल्या गेल्या नाहीत त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय कोणतीही शासनाची मेघा नोकर भरती होऊ देणार नाही असा इशारा सोलापुरातील मराठा आरक्षण परिषदेनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मान्यवरांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला मराठा समाजातील छुप्याअसंतोषाचा कधीही उद्रेक होऊ शकतो त्यामुळे समाजाचा अंत न पता 30 दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्यावा असा अल्टिमेट देखील यावेळी राज्य शासनाला दिला.


मराठा आरक्षणासाठी - मराठा आरक्षण परिषद सोलापुरात झाली या आरक्षण परिषदेत जिल्हा राज्यातील अनेक अभ्यास तज्ञांनी येऊन मते व्यक्त केली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेचे राज्य सरकारवर खापर  फोडत राज्य शासनाला 30 दिवसांचा अल्टिमेट दिला.

    
आता आम्ही कुणाकडे निवेदन - घेऊन जाणार नाही .सरकारशी कुठलीही चर्चा करणार नाही. मोर्चे कसे काढायचे हे मराठा समाजाला सांगायची गरज नाही. त्यामुळे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या शिफारसी मध्ये दुरुस्ती करून येत्या तीस दिवसात मराठा समाजाला घटनात्मक व कायदेशीर आरक्षण मिळावे .अशी आग्रही मागणी मराठा समाज आरक्षण समिती चे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केली.