Ticker

6/recent/ticker-posts

मोदी सरकारच्या क्रीडा धोरणांमुळे भारताचे जागतिक क्रीडाक्षेत्रात वर्चस्व; नव्या भारताच्या सामर्थ्याचा विजय - जमाल सिद्दिकी


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (ISSF) विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिरंगा अभिमानाने फडकावला असून,भारतीय बुद्धिबळपटू R Praggnanandhaa यांनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तसेच भारतीय कुस्तीपटूंनी आशियाई कुस्ती स्पर्धेत वर्चस्व गाजवत देशाचे नाव उंचावले, तर पॅरा-ॲथलीट Sumit Antil यांनी पुन्हा एकदा स्वतःचाच विश्वविक्रम मोडून नवा इतिहास रचला आहे.



या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष Jamal Siddiqui यांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले. ते म्हणाले की,हा केवळ खेळाडूंचा विजय नसून नव्या भारताच्या आत्मविश्वासाचा,निर्धाराचा आणि सामर्थ्याचा विजय आहे.
सिद्दिकी यांनी सांगितले की,पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली 'खेलो इंडिया'सारख्या उपक्रमांपासून ते ऑलिम्पिक तयारी मोहिमांपर्यंत राबविण्यात आलेल्या विविध धोरणांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला नवी दिशा आणि बळ मिळाले आहे. खेळाडूंना आधुनिक सुविधा,प्रशिक्षण आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आज भारत जागतिक क्रीडाक्षेत्रात आपली ठळक छाप उमटवत आहे.

भारतीय खेळाडूंच्या सातत्यपूर्ण यशामुळे देशातील युवा पिढीला प्रेरणा मिळत असून,भारत क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.