मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातावर तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,हा विमान अपघात रहिवासी भागात झाल्याने त्याची भीषणता अधिकच वाढली असून या घटनेने संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. या अपघातामध्ये अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले असून संपूर्ण महाराष्ट्र या दुःखात सहभागी आहे. या कठीण प्रसंगातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळावी,अशी प्रार्थनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन यंत्रणांना तात्काळ कृती करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा आणि नागरिक या आपत्तीच्या काळात गुजरातमधील प्रशासनासोबत ठामपणे उभ्या आहेत,असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.