प्रभाग 26 मधील राऊत वस्ती,AG पाटील नगर,कोरे नगर,विराट नगर,मधील नागरिकांच्या वतीने माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा भव्य नागरिक सत्कार.
प्रभाग 26 हा हद्दवाढ झाल्यापासून अनेक समस्या उदा.ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती.पासून वंचित होतो. प्रत्येक निवडणूक वेळी आपल्या नगरातील समस्या दूर करतो म्हणून आश्वासन द्यायचे. परंतु निवडणूक झाल्यानंतर कोणीच तिकडे फिरकत नव्हते. परंतु माजी नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यानंतर सतत नागरिकाच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या दूर करीत आहेत. व त्यांचा नगरसेवकाचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा सोलापूर महानगरपालिका आयुक्त व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्याकडे विकासासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत व अनेक नगराचा कायापालट करीत आहेत.
विशेष म्हणजे जुळे सोलापुरातील पाण्याचा प्रश्न रात्री अप रात्री पाणी सोडत असल्याने महिलांना होणारा त्रास हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांना हे बाब लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रात्री होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करून दिवसा पाणीपुरवठा पूर्ण दाबाने करण्यात आल्याने हजारो महिलांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानले.
सदर केले कामाबद्दल नागरिकाच्या वतीने आदर्श मार्कंडेय विद्यालय येथे नागरिक सत्कार करण्यात आला. त्यावेळी आदर्श मार्कंडेय विद्यालय येथील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही जवळपास 32 वर्षापासून सदर नगरात राहत असून अनेक नगरसेवक निवडून गेले परंतु आमच्या समस्या कोणीही सोडवल्या नव्हत्या आम्ही नरक यातना भोगत होतो.
माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सतत प्रभागातील नागरिकाच्या व आमचे संपर्कात राहून आमच्या अनेक समस्या दूर केल्यात व उर्वरित राहिलेल्या समस्या बाबत पाठपुरावा करीत आहेत अश्या ह्या तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक गायकवाड सर,मुचांडे सर, संतोष धोत्रे,जयश्री शेगावकर, सारिका धोत्रे,अनुराधा राऊत, जयश्री राऊत,ज्योती काशीद, अश्विनी राऊत,कमल मोरे, रेशमा राऊत,रूपा धनशेट्टी, प्रभावती चौधरी,शोभा पाटील, शोभा वाघमारे व इतर असंख्य महिला वर्ग उपस्थित राहून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला.