अनिल कपूरचा चित्रपट नायक प्रमाणे प्रत्यक्ष कामाची पुनरावृत्ती...
सोलापूर : दि०४ (एमडी२४न्यूज) प्रभाग २६ मध्ये ज्या ज्या ठिकाणी नवरात्र उत्सव चालू आहे त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व पावसामुळे झालेले चिखलमय रस्ते ताबडतोब माजी राजश्री चव्हाण यांनी मुरुमीकरण करून त्यावर रोलिंग करून दिले.
प्रभाग २६ मधील गुरुदेव दत्त नगर एक ते पाच,परमेश्वर नगर, अक्षय सोसायटी,बँक कॉलनी,उद्धव नगर ते रेणुका नगर येथील जवळपास पाच ते दहा नगराला जोडणारा रस्ता, रत्न मंजिरी नगर,राघवेंद्र नगर,राम नारायण चंडक विहार,ओम गर्जना चौक,रोहिणी नगर भाग एक,अशा अनेक नगरामध्ये पावसामुळे रस्ते चिखलमय झाले होते. सदर ठिकाणी नवरात्र उत्सव होत असल्याने त्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते व रस्ते चिखलमेय झाले होते तेथील नागरिक यांनी माजी राजश्री चव्हाण यांना सदर चिखलमय झालेले रस्ते दुरुस्त करावे म्हणून विनंती केल्या होत्या त्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याने तात्काळ सदर रस्ते दुरुस्त करावेत म्हणून झोन ५ कडील अधिकारी बाबर यांना आदेश दिल्याने तात्काळ जेसीपी टिपर उपलब्ध करून देऊन त्यावर मुरूम टाकून दिले. सदर ठिकाणी मुरूम टाकल्यानंतर माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी स्वखर्चाने रोलर बोलावून घेऊन वरील ठिकाणी रोलिंग करून दिल्याने वरील नगरातील नागरिक व नवरात्र उत्सव करणारे देवी भक्तांना सदर रस्त्यापासून होणारा त्रास कमी झाला. तर आय एम एस कॉलेज ते शिवशक्ती रिक्षा स्टॉप बॉम्बे पार्क येथील स्ट्रीट लाईट गेल्या दोन दिवसांपासून बंद होते त्या समस्या नागरिकांनी सांगितल्यामुळे तात्काळ चालू करून दिले. आणि परमेश्वर नगर येथे ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे घाण पाणी सदर नगरात गेल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती ही बाब सदर नगरातील सुजाण नागरिक विजय चव्हाण यांनी माजी नगरसेविका चव्हाण यांना सांगितल्यानंतर तात्काळ रोडीग मशीन आणून तेथील समस्या तात्काळ दूर केल्या त्यामुळे नवरात्रीच्या उत्सवात होणारा त्रास कमी झाला. त्यामुळे वरील नगरातील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की माजी नगरसेविका चव्हाण ह्या निवडून आल्यापासून सतत नागरिकांच्या संपर्कात राहून अनेक नगराचा कायापालट केला आहे.
म्हणून तात्पर्यकार्य करणारे नगरसेवकांचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून येतात व शासन दरबारी,सोलापूर महानगरपालिकेत सतत पाठपुरावा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना समस्या बाबतीत सांगितल्यानंतर तात्काळ आमची कामे होत असतात. उदा.अनिल कपूर यांचा चित्रपट नायक ह्या चित्रपट प्रमाणे प्रत्यक्षात नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. अशा ह्या कर्तव्यदक्ष,कार्यतत्पर,रणरागिनी नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या व केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या.