Ticker

6/recent/ticker-posts

राऊत यांच्या विरोधात निर्भय नागरिक सभेला मागणी

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात निर्भय नागरिक सभेला मागणी

सोलापूर : दि.२५ (प्रतिनिधी) निर्भय सभांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा परिणाम घडवून आणला. नागरिकांची ऊर्जा महाविकास आघाडीच्या बाजूने वळविण्यात डॉ. विश्वमभर चौधरी व ॲड.असीम सरोदे  यांच्या भाषणांचा,त्यांनी तयार केलेल्या मत प्रवाहाचा मतदारांवर झालेला प्रभाव मविआ आणि विरोधी पक्षांनीही दखल घेतली असा आहे. 





यापार्श्वभूमीवर विविध लोकशाही संघटना आणि अनेक राजकीय पक्षांनी आता निर्भय सभांची मागणी केली आहे. महाराष्ट्रातून तब्बल ७१ ठिकाणांवरून सभांची मागणी आली असून बार्शी तालुक्यामधून आमदार राजेंद्र राऊत यांच्यापासून लोकांनी निर्भय करून जागृत करण्यासाठी सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मागणी आल्याचे निर्भय नागरीक सभांचे समन्वयक उत्पल चंदावर यांनी कळवले आहे.

राजकारणाला व राजकीय नेत्यांना समाजातील प्रश्नांचा प्राध्यानक्रम ठरवताच आला पाहिजे, सतत दिखाऊपणा, जाहिरातींवर जनतेचा पैसा उधळणे चुकीचे आहे याची जाणीव जशी आम्ही मतदारांना करून दिली त्याचप्रमाणे यावेळी शेती,कृषी उत्पादन भाव,पर्यावरण,आरोग्य,शिक्षण, कायदे असे विषय आम्ही चर्चेत आणणार असल्याचे डॉ. विश्वमभर चौधरी म्हणाले. 


निर्भय नागरिकांच्या सभा घेतांना यावेळी आमचा महाविकास आघाडीला सशर्त पाठिंबा असेल व माविआ निवडून आल्यावर महाराष्ट्रातील जनतेसाठी कोणती कामे प्राध्यान्याने करणार हे त्यांनी निर्भय नागरिक सभा घेणाऱ्या टीमला स्पष्टपणे सांगावे असे ॲड.असीम सरोदे म्हणाले. आम्ही अजूनही महाराष्ट्रात कुठे सभा घ्यायच्या, किती सभा घ्यायच्या हे नक्की केलेले नाही पण जनतेतून जो प्रतिसाद येतोय आणि आमच्या सभांची मागणी केली जातेय हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला आहे हे दर्शविणारे आहे अशी भावना ॲड.सरोदे व डॉ चौधरी यांनी व्यक्त केली.